Solapur Crime News: सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच खोलीत एक तरुण आणि तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकाच ओढणीला गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी दोघांनीही एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आम्ही भाऊ-बहीण असा उल्लेखदेखील केला आहे. त्यामुळं त्यांनी आत्महत्या नेमकी का केली असावी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सोलापुरातील कर्णिक नगर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. रोहित ठणकेदार 23 आणि अश्विनी केशापुरे असं आत्महत्या करण्याऱ्या तरुण-तरुणीचं नाव आहेत. दोघांनी एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्यांनी चिठ्ठीत आपण भाऊ-बहिण असल्याचा उल्लेखदेखील केला. तसंच, त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार, रोहित हा अश्विनीला बहिण मानत होता. तरीदेखील त्यांनी आत्महत्या का केली व चिठ्ठीत असा उल्लेख का केला, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रोहित आणि अश्विनी यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिलं होतं की, आम्ही दोघं बही-भाऊ आहोत. विनाकारण आमच्या नात्यावर कोणीही संशय घेऊ नका. आमच्या आत्महत्येला आई-वडील जबाबदार नाहीयेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते का, त्यातून त्यांनी आत्महत्या केली का, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुरामुळं त्यांच्या नात्याचे गूढ वाढले आहे. रोहित हा चालक म्हणून काम करत होता तर अश्विनीने बी फार्मसीचे शिक्षण घेतले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून भाऊ-बहिण असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर एकाच ओढणीने गळफास घेत जीवन संपवलं. या प्रकरणी सिव्हील पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.
घरी उशिरा आल्याच्या कारणावरून वडिलांनी रागावल्याने व किरकोळ मारहाण केल्याने संतापाच्या भरात मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगावातील खेडी गावात ही घटना घडली आहे. प्रज्ञाच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.