Tomatoes Salmonella Contamination: डाळ ते भाज्या आणि सॅलडपर्यंत जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात टोमॅटो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मूलभूत गरज असलेल्या टोमॅटो टोमॅटोशी संबंधित एक भयावह बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या अन्न नियामक संस्थेने (अन्न आणि औषध प्रशासन) टोमॅटोमध्ये 'साल्मोनेला' नावाचा धोकादायक जीवाणू असल्याचं म्हटलंय. त्यानंतर अमेरिकेतील अनेक राज्यांमधून टोमॅटोचा संपूर्ण माल परत मागवण्यात आलाय.
साल्मोनेला बॅक्टेरियाने संक्रमित टोमॅटो आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात. यामुळे उच्च ताप, पोटदुखी, उलट्या, अतिसार आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती एफडीएच्या अहवालात देण्यात आलीय मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना सर्वाधिक धोका असतो. 28 मे रोजी एफडीएने या संसर्गावर उच्चस्तरीय इशारा जारी केला. याचे गांभीर्य ओळखून त्याला वर्ग-1 श्रेणीत ठेवले गेले. कोणत्याही अन्न उत्पादनासाठी सर्वात गंभीर इशारा मानला जातो.
विशेषतः जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना आणि दक्षिण कॅरोलिना येथून टोमॅटो परत मागवण्यात आले आहेत. या क्षेत्रात टोमॅटोचे उत्पादन आणि वितरण मोठ्या प्रमाणात केले जाते. समोर आलेल्या अहवालांनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीपासून अमेरिकेतील अनेक शेतांनी स्वेच्छेने टोमॅटो परत मागवण्यास सुरुवात केली.
सीडीसी म्हणजेच सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, साल्मोनेलाचा संसर्ग हे अन्न विषबाधाचे प्रमुख कारण आहे. त्याचे जीवाणू उष्ण आणि कोरड्या वातावरणात आठवडे आणि ओलावा किंवा फ्रीजरमध्ये महिने टिकू शकतात. म्हणूनच एफडीएने लोकांना संक्रमित टोमॅटो वापरण्यास मनाई केलीय.
अमेरिकेची गणना जगातील सर्वात मोठ्या टोमॅटो उत्पादक देशांमध्ये होते. येथे 20 हून अधिक राज्यांमध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. ज्यामध्ये फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे केंद्र आहेत. 2023 मध्ये अमेरिकेत 2.5 लाख एकरमध्ये टोमॅटोची लागवड करण्यात आली होती, एका एकरातून सरासरी 50 टन टोमॅटोचे उत्पादन झाले होते. एकूणच त्या वर्षी अमेरिकेने सुमारे 715.6 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 6150 कोटी रुपये) किमतीचे टोमॅटो उत्पादन केले.
या संसर्गामुळे आतापर्यंत कोणताही मृत्यू झाला नसल्याचे स्पष्टीकरण एफडीएने दिले आहे. परंतु खबरदारी म्हणून लोकांना जागरूक आणि सावध राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. भारतासारख्या देशांनीही या घटनेतून धडा घेण्याची गरज आहे. भारतात अनेक ठिकाणी अन्न सुरक्षेबाबत अनेकदा दक्षतेचा अभाव दिसून येतो. टोमॅटोसारख्या दैनंदिन अन्नपदार्थांमध्ये संसर्गाचा धोका हा एक इशारा आहे. यातून शिकून आपल्याला शेती आणि अन्नसाखळी मजबूत करावी लागेल, असे मत व्यक्त केले जातेय.